मला नेहमी असं वाटतं.. माणूस जन्माला येतो न तेव्हा आपल्यासोबत एक कोरी डायरी घेऊन येतो......आयुष्यात त्याला अनेक व्यक्ती भेटतात ... आणि हे प्रत्येक जण स्वतःची एक गोष्ट घेऊन येतात...मग या कोऱ्या डायरीच्या प्रत्येक पानावर एकाची गोष्ट लिहिली जाते.... असा हा प्रत्येक जण आपापल्या गोष्टीतला प्रमुख नायक/नायिका असतो.. आपल्या आयुष्यात येणाऱ्या या व्यक्तींमुळेच खरंतर आपला आयुष्य समृद्ध बनत जातं...नकळत या व्यक्ती आपल्या डायरीचा आणि पर्यायाने आपल्या आयुष्याचा एक भाग बनून जातात...आणि सुरु होते एक गोष्ट आपल्या आयुष्याची....
अशाच माझ्या डायरीच्या एका पानावरची (एका व्यक्तीची) ही गोष्ट....एका नायकाने लिहिलेली...
आज तू अशीच निघून ये, जगाची बंधनं झुगारून दे
आज नाही म्हणू नकोस, बहाणे मारून पळही काढू नकोस
प्रेम खोटा का होईना पण असा तोंडावर बोलू नकोस....
आज तू अशीच निघून ये............
रोजच्यासारखी आजही तुझी वाट पाहतोय, जागेपणीही तुझीच स्वप्नं पाहतोय
तुझ्या आठवणीत सरत जातो, अंधारात कुठेतरी चाचपडत राहतो
तुझा रस्ताही विरत चाललाय, त्या फुलांच्या पायघड्यांवरून एकदा तरी चालून ये
आज तू अशीच निघून ये ..........
कधीतरी मनाशी प्रामाणिक हो, स्वप्नांना सत्य करण्याचा प्रयत्न कर
प्रेमाचा असा खेळ करू नकोस, मुक्तपणे प्रीतीच्या सागरात तरून जा
तू माझी आहेस असा मी कधीच म्हणणार नाही , पण मी तुझाच आहे हे पटवून घेण्यासाठी एकदा तरी ये.....
आज तू अशीच निघून ये.......
तुला बरंच सांगायचं आहे , तुझ्याकडून काही ऐकायचं आहे
खूप काही मनात साठलं आहे, खोल प्रेमाच्या सरोवरात दाटलं आहे
नेहमीच तुला जे सांगायचं राहून गेलं, ते ऐकण्यासाठी आज ये.....
आज तू अशीच निघून ये.......
तुझ्यातली वास्तविकता पटते मला, वरून नाही म्हटलीस तरी आतला आवाज कळतो मला
पण कधीतरी माझाही विचार कर, मग तुझ्या मनाला एकदाच विचारून बघ
मनातला कधी मला सांगितला नाहीस तरी चालेल पण एकदा तरी माझ्यातली आतुरता घेऊन ये.....
आज तू अशीच निघून ये.......
डोळ्यातले अश्रू पुसून येऊ नकोस, एकदा तरी माझ्यासाठी त्यांना तुझ्या डोळ्यात पहायचंय
माझ्याजवळ आल्यावर माझ्याशी बोलूही नकोस, एकदाच तुला डोळे भरून बघायचंय
एवढा मात्र नक्की कर....
निघायची वेळ आधीच ठरवून येऊ नकोस, आज तरी माझ्यासाठी थोडा वेळ वेळ घेऊन ये......
आज तू अशीच निघून ये.......